नमो शेतकरी योजनेचे ८१ लाख लाभार्थी


नमो शेतकरी योजनेचे ८१ लाख लाभार्थी

पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच होणार अंमलबजावणी, मे मध्ये मिळणार एकत्रित ४ हजारांचा हप्ता

शेती व्यवसायाचा सन्मान म्हणून सुरू करण्यात आलेल्या 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी राज्याकडूनही करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० फेब्रुवारीला केली होती. त्यानुसार 'नमो शेतकरी महासन्मान निधी' ही योजना केंद्र सरकारच्या निकषांनुसारच राबवावी, अशी शिफारस कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी राज्य सरकारला केली आहे.


 परिणामी, केंद्र सरकारच्या १३ व्या हप्त्यानुसार ८१ लाख ३८ हजार १९८ शेतकऱ्यांना आता केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये मिळतील.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत राज्यातील १ कोटी १०

लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २३ हजार कोटी रुपये इतका लाभ देण्यात आला आहे. यात आतापर्यंत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. मात्र, त्यानंतर केंद्र सरकारने वेगवेगळे निकष लावल्याने लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होत गेली. त्यात प्रामुख्याने ई- केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. प्राप्तिकर भरणारे; परंतु नावावर शेती असलेले, सरकारी अधिकारी व कर्मचारी अशांना या यादीतून वगळण्यात आले आहे.

 तसेच शेतकऱ्यांच्या ज्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा होत आहेत, अशा खात्यांना आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली. केंद्र सरकारने नुकताच या योजनेचा १३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या नावावर जमा केला. त्यानुसार या योजनेत राज्यात आता केवळ ८१ लाख ३८ हजार १९८ शेतकरी पात्र ठरले आहेत